रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर घडली थरारक घटना; तिघेजण बुडाले

रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर तिघेजण बुडाले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Sep 29, 2024, 07:39 PM IST
रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर घडली थरारक घटना; तिघेजण बुडाले title=

Ratnagiri Ganpatipule Beach : कोकणातील लोकप्रिय स्थळांपैकी एक असलेल्या रत्नागिरी येथील गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर थरराक घटना घडली आहे. तिघेजण बुडाले आहेत. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. एकाला वाचवण्यात यश आले आहे.
मृत्यू पावलेले दोघे JSWचे अधिकारी होते.  प्रदीप कुमार आणि मोहम्मद आसिफ अशी त्यांची नावं आहेत. गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. समुद्राचा आनंद लुटताना खबरदारी घेणे देखील गरजेचे आहे. निष्काळजूपम जीवावर बेतू शकतो.